रस्त्याने पायी निघालेल्या महिलेचा विनयभंग

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणारी महिला पायी जात असतांना दोन जणांनी विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीसात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात राहणारी महिला ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शुक्रवार ६ मे रोजी रात्री १० वाजता महिला ही आपल्या नातेवाईकांच्या घरी जेवण करण्यासाठी पायी जात असतांना संशयित आरोपी निआज अली (पुर्ण नाह माहित नाही) आणि त्याच्या सोबत असलेला एक अनोळखी व्यक्ती यांनी महिलेच्या अंगावरी ओढणी ओढून तिचा विनयभंग केला. तर महिलेच्या कानशिलात मारून दोघे घटनास्थळाहून पसार झाले. याप्रकरणी विवाहितेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवार ७ मे रोजी रात्री एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय धनगर करीत आहे.

 

Protected Content