Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाआघाडी सरकार काही दिवसच टिकणार : राणे

मुंबई प्रतिनिधी | राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे थोडेच दिवस उरले असून ते लवकर कोसळणार असल्याचे भाकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले आहे.

भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारचं आयुष्य जास्त नसल्याचा इशारा दिला आहे. तसेच लवकरात लवकर महाराष्ट्रात भाजपाचं सरकार येईल, अशी नवी राजकीय भविष्यवाणी केलीय.

या संदर्भात नारायण राणे म्हणाले की,  लवकरात लवकर महाराष्ट्रात भाजपाचं सरकार येईल आणि तुम्हाला अपेक्षित बदल दिसेल. माझ्या आतमध्ये जी गोष्ट आहे ती आत्ताच बाहेर सांगायची नाहीये. एखादं सरकार पाडायचं असेल आणि नवं सरकार स्थापन करायचं असेल तर काही गोष्टी गुपित ठेवाव्या लागतात. अशा ठिकाणी काही बोललो तर आणखी एखादा महिना पुढे ढकलेल.

Exit mobile version