Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

श्री गणेशाच्या आगमनाने सर्वत्र चैतन्य

ganesh murti

मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्राचे लाडके दैवत असणार्‍या गणरायाच्या आगमनानिमित्त सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्मित झाले असून बाप्पाचे जल्लोषात स्वागत केले जात आहे.

आज गणेश चतुर्थीनिमित्त सर्वत्र चैतन्यदायी वातावरण पसरले आहे. राज्यभरातील बहुतेक बाजारपेठा यानिमित्त फुलल्या आहेत. गणेशमूर्ती, पूजा सामग्री आदींच्या दुकानांवर गर्दी उसळली आहे. घरगुती गणेशमूर्ती खरेदी करण्यासाठी सकाळपासूनच प्रारंभ झाला आहे. तर विविध मंडळांच्या मिरवणुकादेखील निघाल्या आहेत.

Exit mobile version