Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

४० लाखांच्या खंडणीसाठी मित्रांनीच केला खून

4khun1 1

पुणे प्रतिनिधी । भोसरी येथील एका व्यावसायिकाच्या मुलाचे ४० लाखांच्या खंडणीसाठी मित्रांनीच अपहरण करुन त्याचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. तरुणाचा मृतदेह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा सर्व प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अब्दुल अहाद तय्याब सिद्दीकी (वय-१७ रा.दापोडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. उमर नसीर शेख (वय-२१ रा.खडकी) असे आरोपीचे नाव असून त्याला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

मृत अब्दुलच्या वडिलांचा भोसरी येथे एक छोटासा व्यवसाय असून अब्दुल त्यांना त्यात मदत करतो. शनिवारी रात्री ८ वाजता राहत्या घराजवळील परिसरातून शेख हा सिद्दिकीला घेऊन गेला होता. त्यानंतर दोघे बिअर प्यायले. या अपहरणानंतर शेख याने सिद्दीकीच्या घरी फोन करून ४० लाख खंडणीची मागणी केली. मयत अब्दुलचे वडील हे भंगारचा व्यवसाय करत असल्याने कुटुंबाकडे एवढे पैसे नसल्याचे समजताच शेख याने सिद्दीकीचा गळा आवळून खून केला. ‘खतरनाक खिलाडी २’ हा दाक्षिणात्य चित्रपट पाहून युवकाने हा खून केल्याची कबुली भोसरी पोलिसांना दिली आहे. या प्रकरणी आरोपीला भोसरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Exit mobile version