जळगाव – लाईव्ह टेंडस न्यूज प्रतिनिधी । कुसुंबा येथे अंगणात झाडत असताना किरकोळ वादातून महिलेसह मुलींना मारहाण केल्याप्रकरणी एमआयडीसीत गुन्हा दाखल केला असून या प्रकरणातील संशयितांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील कविता सोनवणे या अंगणात झाडू मारीत असतांना त्यांची मुलगी, नात व मुलाला त्यांच्या शेजारी राहणारे चार जणांनी लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना २५ फेब्रुवारी सकाळी ७ वाजता रोजी घडली होती. याप्रकरणी त्यांच्यावर एमआयडीसी पोलिसात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित फरार होते. यातील संशयित तुषार विलास कोळी (वय-१९) व सचिन नारायण कोळी (वय-२३) दोघ रा. कुसुंबा यांना गावातून ताब्यात घेतले तर रविंद्र उर्फ भुरा शांताराम कोळी (वय-३६) व प्रवीण शांताराम कोळी (वय-४०) यांना न्यायालयात राखीव पोलीस कोठडी असलेल्या दोघांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ गफूर तडवी, पो.कॉ सिध्देश्वर डापकर, पो.ना. अतुल पाटील, सचिन पाटील, किशोर पाटील, नाना तायडे, गोविंदा पाटील यांनी केली.