Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाच, पंचवीस नव्हे तब्बल पन्नास वर्षे महाविकास आघाडीचं सरकार – ठाकरे

Uddhav Thackeray 1

 

नागपूर वृत्तसंस्था । उद्यापासून सुरु होत असलेल्या हिवाळी अधिवेशनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नागपूरात दाखल झाले असून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, पाच, पंचवीस नव्हे तब्बल पन्नास वर्षे महाविकास आघाडीचे सरकार राज्यात कायम राहिल, असे व्यक्तव्य मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.

ठाकरे म्हणाले, माझ्याकडे जनतेचे आशिर्वाद आहेत. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण हा संपूर्ण महाराष्ट्र एक आहे. महाराष्ट्राला देशाला अभिमान वाटेल असे सरकार, शासन आम्ही चालवू. जर आपण एकत्र आलो तर हे सरकार केवळ पाच वर्षेच नव्हे तर २५ वर्षेच काय ५० वर्षे आणि पिढ्यान पिढ्या कायम राहिलं, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Exit mobile version