Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज ठाकरेंविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा- संभाजी ब्रिगेड

पुणे, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत शिवाजी महाराजांच्या समाधीचा इतिहास चुकीचा सांगितला असून यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडतर्फे करण्यात आली आहे.

रायगड येथिल छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी टिळकांनी बांधली, असे चुकीचे सांगितले असून टिळक यांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील राज ठाकरे यानी जे सांगितले आहे ते चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजाच्या समाधीकडे पेशवाई काळात दुर्लक्ष झाले होते. राजर्षी शाहू महाराज यांनी नियोजन करून या समाधीचा जीर्णोद्धार केला असल्याचे संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी यांनी स्पष्ट केले. यामुळे राज ठाकरे यांचेवरच चुकीचा इतिहास सांगितला पर्यायाने राजद्रोह केला असून त्यांच्यावरच राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी यांनी केली आहे.

Exit mobile version