Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भीषण आग : चिमुकल्यासह दोन जणांचा होरपळून मृत्यू

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । मुंबईतील कांदीवली येथील महावीर नगर परिसरातील वीणा संतूर इमारतीत दुपारी १२वाजेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या आगीत चिमुकल्यासह दोन जणांचा होरपळून मृत्यू  झाला आहे. तर तीन जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. ही आग कोणत्या कारणामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.  जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं असून, आगीमुळे मोठे नुकसान झालं आहे.

अधिक असे की, कांदिवली येथील वीणा संतूर इमारतीला ही आग लागली होती. इमारतीच्या ग्राउंड प्लस पहिल्या मजल्यावर ही आग लागली.  लेवल एक प्रकारची असल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाने दिली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळ गाठून आग विझवण्याचा प्रयत्न केला. या आगीत अडकलेल्या  नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आला आहे.

 

या आगीत तीन जखमी असून एकाची स्थिती गंभीर आहे. लक्ष्मी बुरा (वय-४०), राजेश्वरी भरतारे (वय-२४), रंजन शाह (वय-७६) अशी जखमींची नावे आहेत. तर ग्लोरी (वय-४३) आणि , जोसू रॉबर्ट (वय-८) अशी मृतंची नावे आहेय. दुपारी १२ वाजेच्या सुमारास  ही आग लागली. जखमींवर सरकारतर्फे उपचार करण्यात येणार आहे.

Exit mobile version