Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना संकटातही शेतकऱ्यांनी सामर्थ्य सिद्ध केले – मोदी

 

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’द्वारे देशाशी संवाद साधला. त्यांनी देशभरातील शेतकऱ्यांना नमन केले. करोना संकट काळात देशातील शेतकऱ्यांनी आपले सामर्थ्य सिद्ध केले असल्याचे मोदींनी सांगितले.

मोदी म्हणाले, शेतकऱ्यांच्या कष्टांमुळेच आपल्या सण-उत्सवांमध्ये रंग भरले जातात. आपल्या अन्नदात्यास शेतकऱ्यांच्या या शक्तीस वेदांमध्ये देखील नमन करण्यात आले आहे.  देशात यंदा खरीप पिकांची लागवड मागील वर्षीपेक्षा सात टक्के जास्त झाली. दाळी जवळपास पाच टक्के व कापसाची लागवड जवळपास तीन टक्के जास्त झाली आहे. मी त्यांच्या कष्टांना नमन करतो.

Exit mobile version