संसर्ग प्रतिबंधात्मक नियमांची सक्ती?

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राज्यात संसर्ग बाधित रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड टास्क फोर्सची बैठक बोलावली असून या बैठकीत संसर्ग प्रतिबंधात्मक नियमांची सक्ती केली जाईल कि निर्बंध शिथिल राहतील याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

राज्यात संसर्ग बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून गेल्या २४ तासात राज्यात १ हजारापेक्षा अधिक करोना रुग्ण आढळून आले आहेत . या वाढत्या रुग्णसंख्येची राज्य शासनस्तरावरून गंभीर दखल घेण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यात राज्यात करोना रुग्णसंख्येत घट झाली होती. त्यानंतर राज्यसरकारने राज्यातील निर्बंध शिथील केले होते. मात्र, आता पुन्हा करोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत असल्यामुळे या वाढत्या रुग्णसंख्येवर आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सायंकाळी ६ वाजता कोविड टास्क फोर्सची बैठक बोलावली असून या कोविड टास्क फोर्सच्या बैठकीत कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोरोना रुग्णसंख्या वाढली तर मास्क बंधनकारक करणार असल्याचे विधान केले होते. गेल्या २४ तासात एकाही संसर्गबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही. मात्र, असे असले तरी वाढत्या रुग्णसंख्येनंतर आता राज्यातील निर्बंध शिथिलच राहतील की आणखी कडक होतील याबाबत बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.

Protected Content