Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेर तालुक्यात आपत्कालीन भारनियमन; समस्या सोडविण्याची मागणी

रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुका हा केळी पिकासाठी प्रसिध्द आतांना तालुक्यातील अनेक भागामध्ये विज अभावी केळी पिकाचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवून विजेचा पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी संदीप सावळे यांनी उर्जामंत्री नितीन राऊत व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

रावेर तालुक्यातील अहीरवाडी, केऱ्‍हाळा, पाल, रसलपुर परीसरातील शेतकऱ्‍यांचे विज अभावी केळी पिकाचे मोठे नुकसान होत आहे. या परीसरातील शेतकऱ्‍यांनी भाजपा पदाधीकारी संदीप सावळे यांच्याकडे शेतीच्या विजे संदर्भातील समस्या मांडली. यावेळी संदीप सावळे यांनी तात्काळ महावितरणच्या अधिकाऱ्‍यांशी बोलून समस्या सोडवण्याची मागणी केली. त्यानंतर त्यांनी थेट राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणविस यांच्याशी बोलुन शेतकऱ्‍यांची समस्या सोडवण्याची मागणी केली.तर ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनाकडेही तक्रार केली आहे.

तालुक्यातील शेती शिवारामध्ये महावितरण विभागाने अचानक झीरो लोडशेडींग राबविल्याने शेतकरी वर्ग प्रचंड हैराण झाला आहे. मागील दोन दिवसापासून शेतात विज नसल्याने याचा केळी पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. पुढील दोन ते तीन दिसव झीरो लोडशटींगची समस्या अशीच राहण्याची शक्यता महावितरण विभागाकडून वर्तवली आहे. रावेर तालुक्याला उष्णतेच्या झळा बसत असतांना  अचानक झीरो लोडशेडींग राबवित असल्याने याचा फटका केळी पिकाला बसत आहे. पाणी वेळेवर मिळत नसल्याने केळीच्या पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. याबाबत आमदार शिरीष चौधरी यांनी देखिल महावितरणच्या वरीष्ठ अधिका-यांशी बोलणे करून झिरो लोडशटींग त्वरीत बंद करण्याची मागणी केली आहे.

Exit mobile version