या संदर्भात अधिक असे की, संगमनेर येथील शेतकरी नानासाहेब वर्पे यांनी घराजवळील गोठ्यात गायी बांधल्या होत्या. पण गोठ्याजवळुन गेलेली विजेची मुख्य तार अचानक तुटून पडल्याने ९ गायींचा मृत्यू झाला. यात शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ऐन दुष्काळात ९ गायींचा मृत्यू झाल्याने वर्पे कुटुंबावर मोठे संकट उभे राहिले आहे. तसेच महावितरण कंपनीने याकडे दुर्लक्ष करत हलगर्जीपणा केल्याने ग्रामस्थ संतापले आहेत. महावितरणने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.