Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तिहेरी भीषण अपघातात आठ जण मृत्युमुखी !

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । अहमदनगर कल्याण महामार्गावरील डिंगोरे हद्दीतील अंजिरा बाग जवळ झालेल्या तिहेरी अपघातात आठ जणांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी १८ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता घडली आहे. यात ५ पुरूष, १ महिला आणि २ मुलांचा समावेश आहे.

भाजीपाला घेऊन पीकअप ओतूर बाजूकडून कल्याण बाजूकडे जात असताना अपघात झाला. स्थानिक नागरिकांनी अपघात झाल्याची तात्काळ माहिती पोलिसांना दिली आहे. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी तात्काळ स्थानिकांच्या बरोबर मदत कार्य सुरू केले. या अपघातात एकूण मृतांची संख्या ८ आहे. यात ५ पुरूष, १ महिला आणि २ मुलांचा समावेश आहे. अपघातात एकूण पाच लोकांची ओळख पटली आहे. मृत्यू झालेल्या तीन प्रवाशांची ओळख पटविण्याचे काम चालू आहे.

भाजीपाला घेऊन पीकअप ही ओतूर बाजूकडून कल्याण बाजूकडे जात होती. तर कल्याण बाजूकडून ओतूरकडे रिक्षा येत होती. या दोन्ही वाहनांचा अपघात डिंगोरे व पिंपळगाव जोगा गावच्या सीमेवर नगर कल्याण हायवे रोडजवळ असणारे पेट्रोलपंपा समोर झाला. रिक्षा तिच्या ट्रॅकवरून जात असताना पिकअपनं रिक्षाच्या ट्रॅकवर येवून धडक दिल्याने अपघात झाला. या अपघाता रिक्षामधील चालक व २ प्रवासी यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर पिकअप ही घसरत जाऊन कल्याणच्या बाजूकडून येणाऱ्या ट्रकवर धडकली. तर पिकअप वाहनावरील तीन जणांचा मृत्यू झालाा आहे.

Exit mobile version