ज्ञानेश्वर मुळे यांच्या ‘माती,पंख आणि आकाश’ या आत्मचरित्रातून महाराष्ट्रातील युवा पिढीला प्रेरणा आणि आत्मविश्वास मिळालेला आहे. सदर पुस्तक कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अभ्यासक्रमा्त समाविष्ठ आहे. मुळे यांच्या कडे जपान, अमेरीका,मालदीव, मॉरीशस आदी देशांमध्ये राजदूत व वाणिज्यदूत म्हणून काम केल्याचा विशाल अनुभव आहे. ते १ मे रोजी जळगावात दीपस्तंभ फाऊंडेशनने आयोजित केलेल्या युपीएससी व एमपीएससी परीक्षेतील विजयी तसेच मनोबल प्रकल्पातील दिव्यांग विजयी आणि पालकांचा गौरव समारंभासाठी येत आहेत.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे, पोलिस अधिक्षक डॉ पंजाबराव उगले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी युपीएससीतील यशस्वी विद्यार्थ्यांची मनोगते पण ऐकायला मिळणार आहेत. संबंधीत कार्यक्रम दि १ मे,२०१९ रोजी ९.३० वाजता कांताई सभागृह, नवीन बस स्टँड मागे, जळगाव येथे आयोजीत केलेला आहे. याला मोठ्या संख्येने उपस्थीत राहावे असे आवाहन दीपस्तंभ फाऊंडेशन तर्फे यजुवेंद्र महाजन यांनी केले आहे.