पाचोऱ्यात राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदतर्फे आमरण उपोषण

पाचोरा प्रतिनिधी । आदिवासी समुदाय आणि अनुसूचित जातीवर नेहमी होत आलेला अन्याय-अत्याचार, आणि वाढत्या समस्याबाबत नुकतेच राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदच्या माध्यमातून सुनियोजित आमरण उपोषण करण्यात आले.  

सदर उपोषणाची पार्श्वभूमि अशी की, हे उपोषण आदिवासी समुदाय आणि अनुसूचित जाति वर नेहमी होत आलेला अन्याय – अत्याचार, आणि वाढत्या समस्या विषयी होता. सदर उपोषणात सामिल अथवा सहभागी आदिवासी बंधु – भगिनी तसेच इतर समुदायातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपोषणचे सूत्रसंचालक / मार्गदर्शक – नेतृत्व हे “राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे” जळगाव जिल्हाध्यक्ष अॅड. रणजीत सुरेश तडवी यांनी केले. खुप सूत्रबद्धतेने, पारदर्शक नियोजन करून तसेच शासकीय – प्रशासकीय पातळीवर विचारविनिमय – सल्लामसलत करून ह्या उपोषणाचा प्रारंभ करण्यात आला होता. उपोषणाची विशेषता अशी की, जो तो मिळेल त्या वाटेने, गाडीने, पायदळी गावखेडयावरुन येऊन आया, बाया, माता भगिनींनी उपोषणात सक्रिय सहभागी होत होता. सर्व सुरळीत होते. अचानक प्रशासकीय पातळीवर उपोषण संदर्भात सकारात्मक हालचाली सुरु झालेली कुनकुन कानी आली.

पाचोरा – भडगांव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील कार्यकर्त्यांच्या समवेत हजर होऊन, तहसीलदार कैलास चावडे आणि उपविभागीय अधिकारी उपोषण स्थळी पाचारण केले. सर्व विचारांचे तर्क वितर्क होऊन निर्धारित मागण्या मंजूर, पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन आमदार किशोर पाटील यांच्याकरवी देण्यात आले. तसेच तशा आषयाचे लेटर (पत्र) ही अॅड. रणजीत तडवी यांना सर्वासमवेत देण्यात आले. आणि उपोषण कर्ते जिल्हाध्यक्ष अॅड.  रणजीत तडवी, सलीम तडवी यांनी नारळ पाणी प्राशन करून उपोषण मागणीपूर्तता होई पर्यन्त तापुरत्या स्वरुपात उपोषण स्थगीत करण्यात आले. पण तरीही मागण्या पूर्ण होतीलच असा सुर जन सामान्यांमधुन निघत आहे. यावेळी इंडियन लॉयर असोसिएशन जिल्हा अध्यक्ष अॅड. रोहित ब्राम्हणे, राष्ट्रीय अत्यंत पिछडा वर्ग मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष दिपक आदिवाल, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ माजी जिल्हाध्यक्ष विक्रम सोनवणे, जिल्हा मीडिया प्रभारी नंदलाल आगारे यांनी उपोषणस्थळी आदिवासी बंधु भगिनींना मार्गदर्शन केले.

 

Protected Content