Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शॉर्टसर्किट झाल्याने लाखो रुपयांचे पीक जळून खाक

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसोली येथे एका शेतात महावितरण कंपनीचे केबल टाकण्याचे काम सुरू असताना शॉर्टसर्किट झाल्यामुळे एका शेतकऱ्याच्या पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना रविवारी १७ मार्च रोजी दुपारी ३ वाजता घडली आहे.

जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील शेतकरी बळवंत महारु पाटील यांच्या शेतात रविवारी १७ मार्च रोजी केबल टाकण्याचे काम सुरु होते. त्यामुळे वीज बंद होती. हे काम संपल्यानंतर दुपारी ३ वाजता अचानक वीज आली. त्यानंतर बळवंत पाटील यांच्या शेतात शॉर्टसर्किट होऊन पिकांना आग लागली. यात शेतकऱ्याचे दादर, हरभरा यासह चारा जळून खाक झाला आहे. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी घटना पाहताच ते धावत आले. त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. यानंतर बळवंत पाटील यांनी उभे पीक जळालेले पाहून आक्रोश केला.

दरम्यान, या दुर्दैवी घटनेला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा हलगर्जीपणा कारणीभूत असून शासनाने त्वरित नुकसानग्रस्त शेतकऱ्याला भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Exit mobile version