Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

किरकोळ कारणावरून दोन कुटुंबात हाणामारी

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शासकीय आयटीआय कॉलेजजवळ राहणाऱ्या किरकोळ कारणावरून दोन कुटुंबात शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात ३ जणांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बाली करण कातोळी वय-२९ या महिला त्यांच्या पती, जेठानी, सासू यांच्यासोबत जळगाव शहरातील शासकीय आयटीआय कॉलेजच्या बाजूला वास्तव्याला आहे. लाकडी बॅट बनविण्याचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. मंगळवार १२ मार्च रोजी सकाळी ८ वाजता त्यांच्या एकमेकांचे नातेवाईक असलेले दोन कुटुंबांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. यामध्ये बाली करण कातोळी या महिलेसह तिची सासू, जेठानी आणि पती यांना शिवीगाळ करत मारहाण केली. याबाबत महिलेने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार मारहाण करणारे शारदा शिवदास मोरे, आरती सुनील मोरे, सुनील दत्तू कातोळी सर्व राहणार आयटीआय कॉलेज, जळगाव यांच्या विरोधात बुधवार १३ मार्च रोजी रात्री १२.३० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल पल्लवी मोरे हे करीत आहे.

Exit mobile version