Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक : हा भारतीय संविधानावरील हल्ला : राहुल गांधी

rahul gandhi

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हा भारतीय संविधानावरील हल्ला आहे, अशा शब्दांत राहुल गांधींनी मोदी सरकारवर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.

 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नागरिकत्व विधेयकावर नाराजी व्यक्त करत समर्थन करणाऱ्यांवर टीका केली आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हा भारतीय संविधानावरील हल्ला आहे. या विधेयकाचे समर्थन करणारे आपल्या देशाच्या जो पाया आहे त्याच्यावरच हल्ला करत आहेत, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आठ तासांच्या वादळी चर्चेनंतर सोमवारी मध्यरात्री लोकसभेत मंजूर झाले. विधेयकाच्या बाजूने ३११ तर विरोधात ८० मते पडली. आता राज्यसभेत हे विधेयक मंजूर करताना सरकारची कसोटी लागेल.

Exit mobile version