Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कायदा व सुव्यवस्थेसाठी दोन दिवसांचे अधिवेशन बोलवा : राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई प्रतिनिधी | राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडली असून यावर उपाययोजनांसाठी राज्य सरकारने दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (उच् णववहर्रीं ढहरलज्ञशीरू) यांना पत्र लिहिलं आहे. राज्यपाल कोश्यारींनी आपल्या पत्रात मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणावरुन कायदा सुव्यवस्थेकडे बोट दाखवलं आहे. इतकंच नाही तर राज्यपालांनी कायदा सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्र्यांना दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्याच्या सूचना केल्या आहेत.

राज्यपालांनी या आधी सुध्दा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले होते. यानंतर आता थेट राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल पत्र लिहल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे.

Exit mobile version