Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

…तर भाजपा ममता बॅनर्जींची हत्या करेल : तृणमूल नेत्याचा दावा

कोलकाता । पश्‍चिम बंगालच्या आगामी निवडणुकीत यश मिळाले नाही तर भाजप ममता बॅनर्जी यांची हत्या करू शकतो असा धक्कादायक दावा तृणमूलचे नेते तथा मंत्री सुब्रत बॅनर्जी यांनी केला आहे.

सध्या आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर पश्‍चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापले आहे. यातच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावरील झालेल्या हल्ल्याने वातावरण तणावाचे झाले आहे. यातच जर येती विधानसभा निवडणूक भाजपा जिंकली नाही तर गुप्तपणे लोकांना पाठवून ममता बॅनर्जी यांची हत्या करू शकते, असा आरोप मंत्री सुब्रत मुखर्जी यांनी केला आहे. सुब्रत मुखर्जी हे ममता यांच्या सरकारमध्ये पंचायत राज आणि ग्रामविकास मंत्री आहेत. त्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

तर दुसरीकडे नड्डा व विजयवर्गीय यांच्यावर करण्यात आलेल्या दगडफेकीच्या घटनेला केंद्र सरकारने गंभीरपणे घेतले असून राज्यपाल जगदीप धनखड़ यांच्याकडून अहवाल मागविला होता. धनखड यांचा अहवाल मिळताच केंद्राने तातडीने बंगालचे डीजीपी आणि मुख्य सचिवांना दिल्लीला बोलवून घेतले असून पश्‍चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता देखील बळावली आहे. यातच आता बॅनर्जी यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे.

Exit mobile version