मुंबई (वृत्तसंस्था) आमच्या आमदारांचे मोबाईल बंद असतील, पण तुम्ही त्यांना संपर्क का करताय? भाजपने घोडाबाजार सुरु केला आहे, मात्र त्यांचे पितळ उघडे पडले आहे, असा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.
महाविकास आघाडीने आमदारांना डांबून ठेवले असून, आमदारांचे मोबाईल काढून घेतले आहेत, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. याला प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री आरोप जयंत पाटील यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. भाजप घोडाबाजार करत आहे आणि त्यांचे पितळ आता उघड पडलेले आहे. लोकशाही उद्ध्वस्त करत आहेत, आज त्यांचा डाव फसला आहे. विश्वासदर्शक ठराव महाआघाडी जिंकणारच आहे, 170 पेक्षा जास्त सदस्यांचे पाठबळ आहे,असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.