Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चौघांच्या हत्या प्रकरणाची भुसावळ कोर्टात सुनावणी; उज्ज्वल निकम मांडणार सरकारी बाजू !

भुसावळ प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चौघा भावंडांच्या हत्ये प्रकरणी आज भुसावळ कोर्टात सुनावणी होणार असून यात विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम हे शासनाची बाजू मांडणार आहेत.

रावेरबोरखेडारस्त्यावरील शेत शिवारात चार भावंडांची निर्घृण हत्या केल्याचा भयंकर प्रकार  १६ ऑक्टोबर २०२० रोजी आज सकाळी उघडकीस आला होता. बोरखेडा  शिवारात शेख मुस्ताक यांच्या शेतात गेल्या अनेक वर्षांपासून मयताब भिलाला त्याची पत्नी रुमली बाई भिलाला व दोन मुली आणि तीन मुलांसोबत राहतात. मध्यप्रदेशात त्यांचे नातेवाईक राहतात. त्यांचे नातेवाईकाचा मृत्यू झाल्याने त्यांच्या दशक्रिया विधीसाठी पत्नी आणि मुलासह मध्यप्रदेशात १५ ऑक्टोबर रोजी गेले होते. घरात दोन मुले आणि दोन मुली अशी चारही मुले एकटी होती.चारही भावंडे जेवण करून झोपले असता मध्यरात्री अज्ञात व्यक्ती कुर्‍हाडीने वार करून चारही भावंडांची हत्या केली.

त्यातील सईता ( वय १२ वर्ष) रावल ( वय ११ वर्ष ) अनिल ( वय ८ वर्ष) आणि सुमन वय ३ वर्ष ) या चौघांचा खून झाल्याचे सकाळी शेतमालक शेख मुस्ताक हे शेतात आले असता घर बंद दिसले. घरात डोकावून पाहिले असता. चारही मुलांचे मृतदेह आणि रक्तांचा सडा दिसून आला. हा भयंकर प्रकार पाहून शेख मुस्ताक यांनी रावेर पोलीसांना माहिती दिली. या हत्याकांडामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.

 

या गुन्ह्यातील संशयित आरोपी मुकेश संन्याल, राज उर्फ गुड्ड्या, सुनील सीताराम, अल्पवयीन मुलगा व अन्य एक असे एकुण पाच जणांना या गुन्ह्यात अटक केली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपींना अटक केली असून त्यांच्या विरूध्द भुसावळ कोर्टात सुनावणी सुरू आहे. हे प्रकरण विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्याकडे सोपविण्यात आले असून आज ते कोर्टात सरकारी बाजू मांडणार आहेत.

Exit mobile version