Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महिला पोलीस अधिकार्‍यावर हल्ला : अर्णबवर गुन्हा दाखल

मुंबई । आज पहाटे अटक करतांना अर्णब गोस्वामी यांनी महिला पोलीस अधिकार्‍यावर हल्ला केल्याची घटना घडली असून यामुळे त्यांच्यावर नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिपब्लिक भारत या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आता पुन्हा एकदा गोत्यात सापडले आहेत. त्यांच्या विरोधात नवी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. गोस्वामी यांना बुधवारी सकाळी मुंबई पोलिसांनी त्यांच्या घरातून अटक केली. यावेळी गोस्वामी आणि त्यांच्या पत्नीने पोलिसांच्या कारवाईला विरोध केला. यावेळी अर्णब यांनी एका महिला पोलीस अधिकार्‍याला मारहाण केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.  त्यामुळे त्यांच्यावर कलम ३५३, ५०४, ५०६, ३४ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आज पहाटे अर्णब गोस्वामी यांनी पोलीस अटक करण्यासाठी गेले असतांना खूप हुज्जत घातली होती. त्यांनी अटकेला विरोध केला होता. यानंतर आज सायंकाळी त्यांच्यावर पुन्हा नव्याने एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

 

Exit mobile version