Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मग तुम्हाला ‘पेंग्वीन सेना’ म्हणायचे काय ? : शेलार संतापले

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | दैनिक सामनामध्ये भाजपचा कमळाबाई उल्लेख करण्यात आल्यानंतर आता भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी उध्दव ठाकरे यांना संतप्त पत्र लिहले आहे.

दैनिक सामनाच्या आजच्या अग्रलेखात भाजपचा उल्लेख कमळाबाई असा करण्यात आला आहे. यावरून मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशीष शेलार संतापले असून त्यांनी थेट उध्दव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. यात म्हटले आहे की, ”आपण आमच्या कमळाला कमळाला हिणवायला बाई म्हणताय हरकत नाही. मात्र, बाईमध्ये आई, ताईमध्ये कडक लक्ष्मी पण आहे. त्यामुळे तुमच्यातल्या उरल्या सुरल्या पक्षाला आम्ही ‘पेंग्विन सेना’ म्हणायचं का?” असा प्रश्न शेलारांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे.

आज प्रकाशित झालेल्या सामनातील अग्रलेखात सरकारवर विविध मुद्यांवरून टीका करण्यात आली आहे. ही टीका करताना शिवसेनेकडून भाजपला कमळाबाई असं हिणवण्यात आलं आहे. यावरच आशीष शेलार यांनी आक्षेप घेतला आहे.

Exit mobile version