Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अर्णव पाटीलने खाऊचे पैसे दिले पूरग्रस्तांना

वरणगाव प्रतिनिधी । खाऊसाठी मिळणारे पैसे खर्च न करता गल्ल्याच्या डब्यात ठेऊन बचतीची सवय पालक मुलांना लावत असतात. असेच आजतागायत जमविलेली खाऊची रक्कम पूरग्रस्तांना देण्यासाठी अर्णव पाटील याने आज अकराशे अकरा रुपये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा पूरग्रस्त निधीच्या फंडामध्ये जमा केले आहे. त्याच्या या खारीच्या वाटाचे सर्वत्र कौतूक होत आहे.

चिपळूण कोल्हापूर सांगली या भागांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेकांना बेघर व्हावे लागले आहे. याकरिता वरण गावातील आडनाव पाटील या चिमुकल्या ने खाऊ साठी ठेवलेले अकराशे अकरा रुपये हे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा पूरग्रस्त निधीच्या फंडामध्ये जमा केली आहे. हा अकराशे अकरा रुपयांचा निधी वरणगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष रंजना पाटील यांच्याकडे सुपूर्त केला आहे. यामुळे अर्णव पाटीलचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

 

Exit mobile version