Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ब्रेकिंग : पत्रकार अर्णब गोस्वामींना अटक

मुंबई प्रतिनिधी । रिपब्लीक चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून आज पोलिसांनी अटक केली आहे.

रिपब्लीक चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी हे गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने वादाच्या भोवर्‍यात सापडत आहेत. अलीकडेच त्यांनी टिआरपी वाढविण्यासाठी गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान, याआधी त्यांच्यावर अन्वय नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. तथापि, त्यांच्यावर आजवर कारवाई करण्यात आलेली नव्हती.

दरम्यान, अर्णब गोस्वामी यांना पनवेल पोलिसांनी अटक केली आहे. आज त्यांना न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. अन्वय नाईक या इंटिरीअर डेकोरेटरने आत्महत्या केली होती. अर्णब यांनी आपले पैसे थकविल्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट नाईक यांनी लिहून ठेवली होती. याच गुन्ह्यात त्यांना आज पहाटे अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Exit mobile version