Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अजित पवारांनी राजीनामा द्यावा : नवाब मलिक

4Nawab Malik 14

मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आजही ट्विटरवरुन शेर शेअर केला असून हम होंगे कामयाब! असे सूचक विधान केले आहे. तर अजित पवारांनी चूक केली आहे, त्यांनी राजीनामा द्यायला हवा, असेही मलिक यांनी म्हटले आहे.

 

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड पुकारत भाजपाशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने राष्ट्रवादीसह राज्यात राजकीय भूकंप आला आहे. एकीकडे अजित पवार यांच्याविरोधात काही नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये संतप्त भावना असताना त्यांची मनधरणी करण्याचाही प्रयत्न सुरु आहे. राष्ट्रवादीने मात्र आपण अद्यापही शिवसेना आणि काँग्रेसला सोबत घेऊन सरकार स्थापन करण्यासंबंधी सकारात्मक असल्याचे म्हटले आहे. अगर फलक को जिद है बिजलियाँ गिराने की,तो हमें भी जिद है वहीं पर आशियाँ बसाने की …हम होंगें कामयाब । असे ट्विट केले आहे.

 

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी अजितदादांनी चूक केली आहे, त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, असे सांगितले आहे. आमच्याकडे १६५ आमदारांचे पाठबळ आहे. राष्ट्रवादीचे ५३ आमदार आमच्याबरोबर आहेत. अजित पवारांनी चूक केली आहे, त्यांनी राजीनामा द्यायला हवा. देवेंद्र फडणवीस यांना हे समजले पाहिजे की त्यांच्याकडे बहुमत नाही, आपण चूक केली आहे हे त्यांना समजले पाहिजे. जर त्यांनी राजीनामा दिला नाही तर आम्ही या सरकारला विधीमंडळाच्या पटलावर नक्कीच पराभूत करू, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

Exit mobile version