Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धारावी नंतर गुजरात लॉबी मुंबई गिळणार : संजय राऊत

मुंबई-वृत्तसेवा | शिवसेना-उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज घणाघाती टिका करतांना गुजराती लॉब पहिल्यांदा धारावी आणि नंतर मुंबईचा घास गिळणार असल्याचा आरोप केला आहे.

शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आज धारावी विकासाचे कंत्राट अदानी यांना देण्याच्या विरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. याआधी खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलतांना भाजपवर जोरदार टिकास्त्र सोडले. ते म्हणाले की, गौतम अदानी हे भाजपचे जावई आहेत. त्यामुळे भाजपने संपूर्ण मुंबईचा सातबारा त्यांच्या नावाने केला आहे. धारावीत गरीब लोकांची घरे व व्यवसाय आहेत. त्यांना तिथेच जागा मिळाली पाहिजे. सरकारने हा प्रकल्प अदानींच्या घशात घालण्यापेक्षा स्वतःच त्याठिकाणी संयुक्त उपक्रम राबवावा, असे संजय राऊत म्हणाले.

याप्रसंगी खासदार राऊत पुढे म्हणाले की, धारावी प्रकल्पात देशातील सर्वात मोठा घोटाळा सुरू आहे. धारावी वाचवा म्हणजे मुंबई वाचवा. धारावी हा पहिला घास असून, त्यानंतर संपूर्ण मुंबई गिळण्याचे कारस्थान गुजराती लॉबीने रचले आहे. या प्रकरणी गुजरात मॉडेल जबरदस्त पद्धतीने पुढे जात आहे. गत काही काळापासून गुजरातमध्ये सातत्याने ड्रग्जच्या खेपा येत आहेत. त्यानंतर ते महाराष्ट्रात येत आहे. आता ते अख्खी धारावी अशा लोकांच्या हातात देत असतील तर संपूर्ण मुंबईत ड्रग्जचा व्यापार सुरू होण्याची भीती आहे. धारावीच्या पोरांना ड्रग्जच्या पुड्या विक्री करताना पहायचे आहे का? हा धारावीतील जनतेच्या तोंडाला पाने पुसून आवळा देवून कोहळा काढण्याचा प्रयत्न आहे

Exit mobile version