Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गिरणा नदीला तब्बल २३ वर्षांनंतर महापूर (व्हिडीओ)

girna mahapur

भडगाव, प्रतिनिधी | गिरणा नदीला तब्बल २३ वर्षांनंतर महापूर आला असून तालुक्यातील गुढे येथे नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे.
या पुरामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे.

 

गिरणा धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने आज (दि.२) सकाळी धरणातून ७५ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले होते. दुपारी पुन्हा ४५ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज सकाळपासून चाळीसगाव ते बहाळ गावाला जोडणारा ऋषिपांथा येथील पुल पाण्याखाली बुडाल्याने संपर्क तुटला आहे. गुढे ते नावरे गावांसाठी संपर्क पुल नसल्याने गेल्या एक महिन्यापासून त्यांचा तुटला आहे. त्यामुळे या गावांना जोडणारा पुल बाधंण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

 

Exit mobile version