Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाऊस आणि अंधारामुळे तीन गाड्यांचा विचित्र अपघात

EANR2wIXYAIi0sL1

 

मुंबई (वृत्तसंस्था) पश्चिम द्रुतगती मार्गावर अंधेरीतल्या उड्डाणपुलावर बुधवारी सकाळी तीन कारची एकमेकांशी टक्कर होऊन एक विचित्र अपघात झाला. या अपघातात आठ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

 

मुंबई शहरासह उपनगरांमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे विविध भागात पाणी साचले आहे. या कारणांमुळे अंधोरीत 3 कार एकमेकांना धडकल्यामुळे अपघात झाला. यामध्ये 8 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. विरुद्ध दिशेने येणाऱ्या गाडीमुळे अपघात झाला. मुसळधार पावसामुळे दृष्यमानता कमालीची घटली होती. त्यामुळे हा अपघात झाला आहे.

Exit mobile version