Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

किरकोळ कारणावरून कुटुंबावर जीवघेणा हल्ला

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  तालुक्यातील वराड बुद्रुक येथे किरकोळ कारणावरून एका कुटुंबातील पाच जणांना लाथाबुक्क्यांसह लोखंडी पाईपाने बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना ६ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी १४ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात ९ जणंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील वराड बुद्रुक गावात दिलीप आत्माराम पाटील (वय-४२) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेतीचे कामे करून आपला उदरनिर्वाह करतात. ६ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरून गावात राहणाऱ्या रविंद्र दिलीप  पाटील यांनी गैरकायद्याने मंडळी जमवून दिलीप आत्माराम पाटील यांच्यासह त्यांच्या परिवारातील बाळू आत्माराम पाटील (वय-५४), सुनंदा बाळू पाटील (वय-५३), भाग्यवती रविंद्र पाटील (वय-१५) आणि पुनम गोकुळ पाटील (वय-२५) यांना लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी पाईपाने बेदम मारहाण करून दुखापत केली. हा प्रकार घडल्यानंतर जखमी झालेल्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर मंगळवारी १४ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास धरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार मारहाण केल्याप्रकरणी रविंद्र दिलीप पाटील, दिलीप गोविंदा पाटील, हिराबाई दिलीप पाटील, योगिता रविंद्र पाटील, बबलू देवीदास पाटील, सचिन दत्तू महाजन, ज्ञानेश्वर महादू पाटील, अजय महादू पाटील, अजय महादू पाटील, समाधान महादू पाटील सर्व रा. वराड बुद्रुक ता. धरणगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय चौधरी करीत आहे.

Exit mobile version