हतनूर धरणाचे ३६ दरवाजे पूर्ण उघडले; काठांवरील गावांना सतर्कतेचा इशारा

भुसावळ प्रतिनिधी । हतनूर धरणाचे ३६ दरवाजे उघडण्यात आले असून यामुळे तापी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्याने काठांवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

तापी नदीपात्रात पाण्याची सातत्याने आवक होत असल्याने पाणी पातळीत वाढ होत आहे. पुढील ७२ तासापर्यंत पाणी पातळीत सतत वाढ होणार असल्याने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
जिल्ह्यातील हतनूर प्रकल्पाचे ३६ दरवाजे उघडले असून ९१२६७ क्युसेक्स इतका विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आला आहे. हा विसर्ग अजून वाढणार आहे. यासाठी पुढील ७२ तासासाठी नागरीकांनी नदी काठावर जावू नये. आपली गुर-ढोरे नदीकाठी जावू देऊ नये व नदीकाठी असल्यास सुरक्षित स्थळी हलवावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Protected Content