महाराष्ट्रातील ३५ आमदार दिल्ली दरबारी – राज्यात काँग्रेसमध्ये समन्वय नसल्याची खंत’
Rahul Shirsale
नवी दिल्ली– लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था | महाविकास आघाडीत सर्वकाही सुरळीत असल्याचे सांगितले जाते मात्र राज्यात काँग्रेसमध्ये समन्वय नसल्याची खंत’ व्यक्त करत काँग्रेसमधील आमदारांनी आपली नाराजी थेट काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे व्यक्त केली आहे.
काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी आणि महाराष्ट्रातील ३५ आमदारांची राजधानी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत काँग्रेस आमदारांनी सोनिया गांधींकडे राज्यातील मंत्र्यांची तक्रार थेट केली आहे.
राष्ट्रवादीत अजित पवार, शिवसेनेत एकनाथ शिंदे आहेत मात्र काँग्रेसमध्ये एकही मंत्री पुढाकार घेत नसून राज्यात काँग्रेस पक्षात कुठलाही समन्वय नसल्याने काँग्रेस आमदारांना निधी मिळत नाही. मंत्री फक्त आपल्या मतदारसंघासाठी निधी घेत असल्याची तक्रारच काँग्रेस आमदारांनी सोनियांकडे केल्याची माहिती समोर येत आहे. कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यावर नेमका काय निर्णय घेतात याविषयी चर्चा सुरु आहेत.