Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यात दिवसभरात १९,२१८ नवे रुग्ण

 

मुंबई – राज्यात गेल्या २४ तासांत १९,२१८ नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ८,६३,०६२ झाली आहे. याशिवाय, राज्यात आज ३७८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या २५ हजार ९६४ वर पोहोचली आहे.

कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल ८३,३४१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १०९६ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या ३९,३६,७४८ वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात ६८ हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.

Exit mobile version