जिल्ह्यात आज कोरोनाचे १५ रूग्ण आढळले; १२ तालुके निरंक !

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात जिल्ह्यातून १५ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ५० जण कोरोनामुक्त झाले आहे. आज १२ तालुका निरंक असल्याचे दिसून येत आहे.

तालुकानिहाय आकडेवारी

जळगाव शहर-४, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-४, अमळनेर-१, चोपडा-०, पाचोरा-०, भडगाव -०, धरणगाव-०,  यावल-०, एरंडोल-०, जामनेर-०, रावेर-०, पारोळा-०, चाळीसगाव-६, मुक्ताईनगर-०,  बोदवड-० असे एकुण १५ बाधित रूग्ण आढळले आहे.

जिल्हा रूग्णालयाच्या दिलेल्या अहवालात आजपर्यंत एकुण जिल्ह्यात १ लाख ४२ हजार ४१० बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३९ हजार ५०६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ३३१ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. विशेष म्हणजे आज १२ तालुका निरंक असल्याचे दिसून आले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे. 

 

Protected Content