Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

होम क्वारंटाईन होण्याच्या वादातून दोघांची हत्या !

 

निलंगा (वृत्तसंस्था) होम क्वारंटाईन होण्याच्या वादातून दोघांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे घडली आहे. या घटनेने जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.

 

निलंगा तालुक्यातील बोळेगाव येथे रविवारी पहाटेच्या सुमारास मुंबईला राहणारा व नुकताच गुजरातहून ट्रक घेऊन आलेल्या एका व्यक्तीस होम क्वारंटाईन व्हावे, असे सांगितल्याने वाद झाला. या वादातून नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यात दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्य़ात आले आहे. या घटनेत फिर्यादी शत्रुघ्न पाटील यांचे वडील शहाजी पाटील व त्यांचा पुतण्या वैभव पाटील यांचा मृत्यू झाला आहे. तर शत्रुघ्न पाटील गंभीर जखमी झाले, अशी प्राथमिक माहिती आहे.

Exit mobile version