Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हरिभाऊंच्या निधनामुळे राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्राची मोठी हानी : अजित पवार

मुंबई (वृत्तसंस्था) हरिभाऊंच्या निधनामुळे राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. अशी श्रद्धांजली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवंगत जावळे यांना वाहिली आहे.

शोकसंदेशात उपमुख्यमंत्री म्हणतात, भाजप नेते सन्माननीय हरिभाऊ जावळे साहेबांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. देशाची संसद आणि राज्याच्या विधिमंडळात प्रतिनिधित्व केलेल्या, सार्वजनिक जीवनात सक्रिय असलेल्या त्यांच्यासारख्या नेतृत्वाचे निधन ही महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्राची मोठी हानी आहे. मी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जावळे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. सन्माननीय हरिभाऊ जावळे साहेबांच्या स्मृतींना विनम्र श्रद्धांजली.

Exit mobile version