सुशांत आत्महत्या : मुंबई पोलिसांनी सहकार्य केले नाही ; बिहार पोलिसांचा आरोप

पाटणा (वृत्तसंस्था) अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी पोस्टमार्टम रिपोर्ट, सीसीटीव्ही फुटेज आणि आतापर्यंत तपासात समोर आलेल्या कोणत्याही सूचना आम्हाला सांगितल्या नाहीत. मुंबई पोलिसांनी आम्हाला सहकार्य केले नसल्याचाही आरोप देखील बिहार पोलिसांनी केला आहे.

 

या प्रकरणी डीजीपी गुप्तेश्वर पांडेय पुढे म्हणाले की, या प्रकरणात ज्यांना आरोपी बनवले आहे, ते पळून जात आहे. बिहार पोलिस केस इतक्या सहजपणे जाऊ देणार नाहीत. सत्य समोर आणूच राहतील. बिहार पोलिस तपासासाठी सक्षम आहेत. परंतू कुटुंबातील लोकांची इच्छा असेल तर सीबीआय चौकशीसाठी अर्ज करू शकतात. तूर्त सुशांत आत्महत्या प्रकरण एक मोठे रहस्य बनले असल्याचेही पांडेय यांनी म्हटले आहे.

Protected Content