Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सरकारच्या हलगर्जीपणाचा परिणाम आपल्या जवानांना भोगावा लागला ; राहुल गांधींचा हल्लाबोल


नवी दिल्ली (वृत्तसंस्था)
आता हे सिद्ध झाले आहे, की चीनने गलवानमध्ये जो हल्ला केला तो आधीपासूनच नोयोजित होता. त्यामुळे सरकार झोपलं होत का?. सरकारच्या हलगर्जीपणाचा परिणाम आपल्या जवानांना भोगावा लागला, असा हल्लाबोल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केला आहे.

 

 

भारत-चीन सीमेवर झालेल्या हिंसक झटापटीत भारताच्या 20 जवानांना हौतात्म्य आले. यामुळे संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटसोबतच एएनआयचे एक वृत्तही ट्विट केले आहे. यात, चीनने केलेला हा हल्ला आधीपासूनच नोयोजित होता, असे संरक्षण राज्य मंत्री श्रीपद नाइक मान्य करत आहे. नेमका हाच मुद्दा पकडत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीपूर्वी राहुल गांधींनी पुन्हा एकदा सरकारवर निषाणा साधला आहे.

Exit mobile version