Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सबका साथ-सबका विकास करत असताना सबका विश्वासही महत्त्वाचा : मोदी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात शांतता आणि एकता गरजेची आहे. सबका साथ-सबका विकास करत असताना सबका विश्वासही महत्त्वाचा आहे. माझ्यासाठी सर्वात पहिले माझा देश महत्त्वाचा आहे त्यानंतर पक्ष आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेय. ते आज भाजपाच्या संसदीय दलाच्या बैठकीत बोलत होते.

 

या बैठकीला संबोधित करताना नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, देश सर्वोच्च असून विकास भाजपाचा मंत्र आहे. त्यासाठी शांतता आणि सद्भावना गरजेचे आहे. विकास पुढे घेऊन जायचा आहे. फक्त बोलू नका तर प्रत्येक खासदाराने शांतता, एकता आणि सद्भावना राखण्यासाठी पुढाकार घेण्यात यावा,असे आवाहन देखील मोदी यांनी केली आहे.

Exit mobile version