Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवाजी नगर उड्डाण पुलाचे काम विहित मुदतीत पूर्ण करा

 

जळगाव, प्रतिनिधी । शिवाजी नगर उड्डाण पुलाचे काम सुरु झाल्यापासून नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून यावर प्रशासन व मक्तेदाराने कोणतीही उपाययोना केली नसल्याचे भाजप नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.

निवेदनाचा आशय असा की, आज २ नोव्हेंबर रोजी काही नागरीकांनी रेल्वे पुलाचे काम कधी पूर्ण होणार आहे अशी विचारणा नगरसेवक दारकुंडे यांना केली असता दारकुंडे यांनी हे काम मार्च पर्यत पूर्ण होणार असल्याचे सांगितले. मात्र, त्यांनी नागरिकांसह कामसुरू असलेल्या जागेवर पाहणी केली असता तेथील विविध अडचणी लक्षात आल्या. यात पिलर उभारणीचे काम संथ गतीने सुरु असल्याचे दिसून आले. या गतीने काम सुरु राहिल्यास विहित मुदतीत काम कसे पूर्ण होणार असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. पुलाचे काम कधी पूर्ण होणार आहे याची माहिती वर्तमान पत्रांतून प्रसिद्ध करण्यात यावी तसेच हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशी मागणी नगरसेवक दारकुंडे यांनी केली आहे.

Exit mobile version