Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विवाहितेच्या हातातून अज्ञात तिघांनी मोबाईल हिसकावला; जिल्हापेठ पोलीसात नोंद

जळगाव प्रतिनिधी । सिंधी कॉलनीत राहणाऱ्या महिलेच्या हातातील मोबाईल अज्ञात तीन भामट्यांनी दुचाकीवर येवून हिसकावून पळ काढल्याची घटन आकाशवाणी चौकात मंगळवारी रात्री १० वाजता घडली. जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, कशिश सतीष नाथानी (वय-३८) रा. कंवर नगर, सिंधी कॉलनी ह्या गृहीण आहेत. दररोजप्रमाणे १९ जानेवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास त्या मैत्रिणीसोबत शतपावली करण्यासाठी निघाल्या होत्या. आकाशवाणी चौकातील ओट्यावर काही वेळ गप्पा मारत बसल्या. मोबाईलवर फेसबुक चेक करत असतांना तीन अनोळखी व्यक्तींनी जवळ येवून हातातील १० हजार रूपये किंमतीचा मोबाईल जबरी हिसकावून पळ काढला. कशिश नाथानी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ पुरूषोत्तम वाघळे करीत आहे.

Exit mobile version