लग्नानंतर १० दिवसांत नवविवाहितेची आत्महत्या !

जळगाव प्रतिनिधी | शहरातील शिवाजीनगरातील एका नवविवाहितेने आज गळफास घेऊन आत्महत्या केली  यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, करीना सागर निकम या मूळच्या न्हावी ( ता. यावल ) येथील माहेर असलेल्या   तरूणीचा विवाह ११ जुलै रोजी जळगावातील दांडेकर नगरातील सागर निकम याच्याशी झाला होता. यानंतर आज सकाळी अकराच्या सुमारास तिने घरात कुणी नसतांना गळफास घेऊन आत्महत्या केली. लग्नानंतर अवघ्या दहा दिवसांमध्ये करीना हिने केलेल्या आत्महत्येमुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 

Protected Content