Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राहूल गांधी हेच काँग्रेसचे खरे नेतृत्व- संजय निरूपम

sanjay nirupam

मुंबई प्रतिनिधी । माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या वक्तव्याचे खंडन करत संजय निरूपम यांनी राहूल गांधी हेच काँग्रेसचे खरे नेतृत्व असल्याचे प्रतिपादन केले आहे.

माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी काँग्रेसला उभारी देण्यासाठी पक्षाचा अध्यक्ष लोकशाही पद्धतीनं निवडला पाहिजे असे मत आज व्यक्त केले आहे. या पार्श्‍वभूमिवर, माजी खासदार संजय निरूपम यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, गांधी कुटुंबाशिवाय बाहेरील कुणीही नेता सध्याच्या घडीला काँग्रेसचं नेतृत्व करू शकत नाही. राहुल गांधी हेच पक्षाचे नेतृत्व करणारे आणि काँग्रेसला वाचवू शकतील असे एकमेव नेते असल्याचा दावा निरूपम यांनी केला आहे. आमचे नेते फक्त गटाचे नेते आहेत आणि असे नेते फक्त गटबाजीला खतपाणी घालतील, असंही ते म्हणाले. पक्षात सहा ते आठ जण असे आहेत जे नेतृत्त्व करण्यासाठी सक्षम आहेत. पण अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात टाकायची याची भीती वरिष्ठ नेत्यांना वाटत असल्याचे निरूपम म्हणाले.

Exit mobile version