Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राहुल गांधी देणार राष्ट्रपतींना दोन कोटी स्वाक्षऱ्यांचे निवेदन

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । शेतकरी कायद्याविरोधात कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे गुरुवारी राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना दोन कोटी स्वाक्षऱ्या असणार निवेदन सादर करणार आहेत.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वात गुरुवारी राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी पक्षातील अनेक मोठे नेते आणि खासदार त्यांच्यासोबत असतील. यानंतर ते राष्ट्रपती यांना निवदेन सादर करणार आहेत. नवे कृषी कायदे रद्द करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मध्यस्थी करावी यासाठी काँग्रेसने संपूर्ण देशभरात स्वाक्षरी मोहीम राबवली होती. दिल्लीच्या वेशीवर गेल्या २८ दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस खासदारांचं शिष्टमंडळ संसद इमारतीजवळील विजय चौक ते राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढणार आहेत. या आंदोलनातून काँग्रेस पुन्हा एकदा शेतकरी कायद्यावरुन मोदी सरकारला घेऱण्याचा प्रयत्न करणार आहे. काँग्रेसने संसदेतही इतर पक्षांसोबत या कायद्याला विरोध केला आहे. राहुल गांधी आणि इतर नेत्यांनी निषेध दर्शवण्यासाठी पंजाब आणि हरियाणात ट्रॅक्टर यात्रादेखील काढली होती.

Exit mobile version