Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यात ‘कोरोनामुक्त गाव’ स्पर्धा ; राज्य सरकारची घोषणा

 

मुंबई : वृत्तसंस्था । आता राज्यातील ग्रामीण भागात कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावं यासाठी ‘कोरोनामुक्त गाव’ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही घोषणा केली आहे.

 

कोरोनामुक्त गाव स्पर्धेत प्रत्येक महसूल विभागात चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या ३ ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख रुपये, २५ लाख रुपये आणि १५ लाख रुपये याप्रमाणे बक्षीस दिले जाणार आहे. ६ महसुली विभागात प्रत्येकी ३ प्रमाणे राज्यात एकुण १८ बक्षीसे दिली जाणार आहेत. यासाठी बक्षीसाची एकूण रक्कम ५ कोटी ४० लाख रुपये असेल.

 

कोरोनामुक्त गाव स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या ३ ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख रुपये, २५ लाख रुपये व १५ लाख रुपये इतक्या निधीची विकासकामे मंजुर केली जाणार आहेत स्पर्धेत सहभागी गावांचे २२ निकषांवर गुणांकन करण्यात येणार आहे

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना गावच्या वेशीवरच कोरोनाला रोखलेल्या गावांचा गौरव केला होता. या उपक्रमास आता अधिक चालना देण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत राज्यातील सर्व गावांनी सहभागी होऊन आपले गाव लवकरात लवकर कोरोनामुक्त करावे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.

 

Exit mobile version