Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोफत अन्नधान्याचे पात्र लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या लाथार्थ्याना माहे जुलै ते सप्टेंबर, 2020 चे धान्य एकत्रितपणे मिळणार होते. परंतु आता नवीन निर्देशानुसार या महिन्यांचे धान्य त्या-त्या महिन्यातच वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

 

माहे जुलै ते सप्टेंबर 2020 या मासिक नियतनाबरोबरच 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ याप्रमाणे प्रति लाभार्थी अतिरिक्त मोफत अन्नधान्याचे वितरण तहसिलदार यांनी मंजूर केल्यानुसार स्वस्तधान्य दुकानदारांमार्फत लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे. त्यानुसार अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Exit mobile version