मुख्यमंत्र्यांना नाहीतर दाउदला सांगणार का? आ.भुयार

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | विकास निधीच्या अडचणी मुख्यमंत्र्यांना नाहीतर दाउदला सांगणार का? अशी टीका अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी खा.संजय राऊत यांच्या आरोपावर केली आहे.

राज्यसभा निवडणुकीत भाजपाने घोडेबाजार करत निवडणूक जिंकल्याचा आरोप शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी केला असून बहुजन विकास आघाडीसह अपक्ष आमदार देवेंद्र भुयार आणि संजय शिंदे यांची नावे घेतली आहेत. यावर अपक्ष आमदारांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभा निवडणुकीपासून मी महाविकास आघाडीसोबत आहे. महाविकास आघाडीत शिवसेना नंतर आली. आणि मतदान हे गोपनिय असते. कोणी मतदान दिले नाही असे सांगण्याचा अधिकार संजय राऊतांना देखील नाही. संजय राऊत हे ब्रह्मदेव आहेत का? आम्ही त्यांना मत दिले नाही. हे त्यांना कसे कळले. आणि माझी मुख्यमंत्र्यावर नाराजी असलीतरी वैयक्तिकरित्या नाही. माझ्या मतदार संघातील प्रश्न सोडवण्यात मुख्यमंत्री कमी पडले ही खंत मी बोलून दाखवली. त्यांना नाही सांगणार तर दाउदला सांगायचे का? अशी खरमरीत टीका अपक्ष आ.भुयार यांनी केली आहे.
जर त्यांना विश्वास नव्हता तर आम्हाला मतदानासाठी घेऊन जायचेच नव्हते. नेते आमच्यासोबत असताना असे आरोप करणे चूकीचे आहे. आमचा विश्वासच पाहायचाच होता तर थांबवून ठेवायचे होते. आम्ही शिवसेनेला मत दिले नसते, असे दुसरे अपक्ष आ.संजय शिंदे म्हणाले आहेत.

 

 

 

 

Protected Content