मुंबई (वृत्तसंस्था) अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे महत्त्वाचे मंत्री अनुपस्थित होते. सीएए मुद्द्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेल्या विधानाचे हे पडसाद असल्याचे भाजपने म्हटले आहे.
महाराष्ट्र भाजपाने यावर ट्विट करत महाविकास आघाडीवर टीका केली आहे. महाविकास आघाडीत सगळं छान सुरु आहे. फक्त सरकारच्या पत्रकार परिषदेला मंत्रिमंडळातील काँग्रेसचे महत्त्वाचे मंत्री उपस्थित नाहीत. बाकी सगळं मस्त चाललंय. मुख्यमंत्र्यांनी सीएए समर्थन केल्याचे पडसाद दिसतायेत असा टोला या ट्विटमध्ये लगावण्यात आला आहे.