Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुंबई पोलिसांवर भरोसा नसेल तर पोलिस संरक्षण सोडून द्या : वरुण सरदेसाई

मुंबई (वृत्तसंस्था) मॅडम, तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय याच मुंबई पोलिसांची सिक्युरिटी कव्हर (पोलिस संरक्षण) घेऊन त्यांच्यावर इतके नीच आरोप करता?? सोडून द्या की सिक्युरिटी कव्हर भरोसा नसेल तर, अशा शब्दात युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी अमृता फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, मुंबईने माणुसकी गमावली, निरपराध आणि स्वाभिमानी लोकांच्या राहण्यासाठी हे शहर सुरक्षित नसल्याचे ट्वीट फडणवीस यांनी केले होते.

 

अमृता फडणवीस यांनी ट्वीटमध्ये लिहिले होते, ज्या प्रकारे सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण हाताळले जात आहे, ते पाहून मला वाटतंय की मुंबईने माणुसकी गमावली आहे आणि निरपराध, स्वाभिमानी लोकांना राहण्यासाठी हे शहर सुरक्षित नाही. त्यावर आता युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी देखील ट्वीट करत जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. मॅडम, तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय याच मुंबई पोलिसांची सिक्युरिटी कव्हर (पोलिस संरक्षण) घेऊन त्यांच्यावर इतके नीच आरोप करता?? सोडून द्या की सिक्युरिटी कव्हर भरोसा नसेल तर, अशा शब्दात सरदेसाई यांनी टीका केली आहे.

Exit mobile version